
श्रमिकचे पाच विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवुन एच.एस.सी.पुणे बोर्डात प्रथम
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणकि वर्ष २०२४-२५ चा १२ वी बोर्ड परीक्षेत महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी श्री.नारायण कलंञी, प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.दिलीप सांगळे, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, संस्थेचे सी.ई.ओ.श्री.रुपेश वालझाडे आदि मान्यवर उपस्थति होते.
“श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असते. विद्यार्थ्यांनी जिध्द,चिकाटी व अभ्यासातील सातत्य यामुळे भरीव यश संपादन केले.विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होणे गरजेचे आहे. यासाठी 3 A Attraction, Affection व Addiction यांपासुन नेहमी स्व:तला दुर ठेवावे.” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
विज्ञान शाखेचा निकाल (९९.७९%) लागला असून त्यात कु. कोटकर तन्मय अमोल व कु.लांडगे श्रेयश रविंद्र (९३.१७%) सर्वप्रथम, कु. सदाकाळ यश चंद्रकांत (९०.१७%) व्दितीय, तर कु. सावंत प्राजक्त बाळासाहेब (८९.८३%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल (९८.६२ %) लागला असुन त्यात कु. चव्हाण ईश्वरी दत्ताञय (९६.३३%) महाविद्यालयात व जिल्ह्यात सर्वप्रथम, कु. कोल्हे पार्थ रावसाहेब (९४.६७%) व्दितीय, तर कु. पाटील प्रनुतन विजय (९२.६६%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
कला शाखेचा निकाल (९०.०५%) लागला असून त्यात कु. महादार निशा चंद्रकांत (९०.८३%) सर्वप्रथम, कु. चौधरी आकाश पुणाजी (८७.६७%) व्दितीय तर कु. घोडे शितल भिवा(८६.३३%) याने तृतीय क्रमांक मिळविला.
अकाऊंट विषयात कु. चव्हाण ईश्वरी दत्ताञय व कु.अदापुरे साई भगवान, आय.टी. विषयात कु.चव्हाण ईश्वरी दत्ताञय, मेकॅनिकल मेन्टेनन्स विषयात कु.लांडगे श्रेयश रविंद्र व कु.सुर्वे ईश्वरी संतोष या पाच विद्यार्थ्यांनी एच.एस.सी. पुणे बोर्डात प्रथम क्रमांक मिळविल्याने श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षी प्रमाणे एच.एस.सी. पुणे बोर्डात प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक व पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ यांनी दिली.
उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्तावकि उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, सुत्रसंचालन प्रा.संदीप वलवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ यांनी मानले.